breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रायगडमध्ये लोकांच्या आणि व्यापाऱ्यांचा तीव्र विरोधामुळे लॉकडाऊन हटवले

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यात, शहरांमध्ये पुन्हा 10 ते 15 दिवसांचं लॉकडाऊऩ घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही लाॅकडाऊन घेण्यात आलं होत.15 जुलैच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आलं होतं. ते 26 जुलैच्या रात्री मध्यरात्रीपर्यंत राहणार होतं. मात्र लाॅकडाऊन केल्यानंतरही कोरोना रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ तसेच जिल्ह्यातील व्यापारी आणि विविध संघटनांचा विरोध यामुळे अखेर लाॅकडाऊन हटवविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. हे लाॅकडाऊन आता 26 एवजी 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून हटविण्याच्या निर्णय घेण्यात आला .म्हणजे कालच हे लॉकडाऊन उठवण्यात आलं

रायगड जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेत तसे प्रशासनाला आदेश दिलेत. त्यामुळे आजपासून म्हणजे 25 जुलै पासून रायगड जिल्ह्यातील व्यवहार सामान्य झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लॉकडाऊनचे आदेश दिले होते. तसेच त्यानंतर आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला होता. मात्र, लोकांच्या आणि व्यापाऱ्यांचा तीव्र विरोधामुळे लॉकडाऊनच हटविण्यात आले आहे. लॉकडाऊन असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत होता. रुग्णसंख्येत वाढही होत होती. या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी आणि काही संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवसच आधीच लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हटविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button