breaking-newsमहाराष्ट्र
राज्यात ६५ हजार जणांची कोरोनावर यशस्वी मात
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अनेकजण कोरोनातून बरे होत आहेत. २१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील ६५,७४४ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ६०,१४७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.