राज्यात २४ तासांत 12 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद
मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांबाबत रोज दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. गेल्या २४ तासांत 12 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 302 मृत पावले आहेत. तर गेल्या 24 तासात 17 हजार 324 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत.
नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णांचा आकडा 15 लाख 06 हजार 018 वर पोहोचला आहे. यामध्ये 39 हजार 732 मृत झाले असून 12 लाख 29 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता 2 लाख 36 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज सर्वाधिक ४७ मृत्यूंची नोंद मुंबई महापालिका हद्दीत करण्यात आली तर सातारा जिल्ह्यात २२ करोना बाधितांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ७४ लाख ८७ हजार ३८३ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १५ लाख ६ हजार १८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २३ लाख ५८८ जण होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.