breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात एनआरसी लागू होऊन देणार नाही.’ – उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

‘नागरिकत्व सुधारणा कायद्याची कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही. तसंच राज्यात एनआरसी लागू होऊन देणार नाही.’, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, ‘एनपीआरला लागू करण्यापूर्वी मी स्वत: त्या अर्जाची तपासणी करेन.’ सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी असे सांगितले की, ‘सीएए आणि एनआरसी दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. तर एनपीआर हा तिसरा मुद्दा आहे. कोणाला सुद्धा सीएएची भिती बाळगण्याची गरज नाही. एनआरसी आला नाही आणि येणार सुद्धा नाही. एनआरसीची अंमलबजावणी केल्यास ती केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर हिंदू, दलित, आदिवासी आणि इतरांसाठी समस्या निर्माण करेल.’ असे त्यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button