breaking-newsमहाराष्ट्र

मुंबई-नागपूर हायवेवर विजेची तार कोसळून तीन बस खाक

जळगाव – मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ विजेची तार पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. विजेची तार कोसळून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बस जळून खाक झाल्या आहेत.

या दुर्घटनेत चालकाने प्रसंगावधान राखल्याने एका बसला वाचवण्यात आले. मात्र तीन बसचे मोठे नुकसान झाले आहे. या बसेस प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ उभ्या असलेल्या बसेसवर ही तार कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. बघ्यांची गर्दी झालेली असल्यामुळे इतर वाहनधारकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button