breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

माझ्या माता-भगिनींचा अपमान करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी गांभिर्यानं घ्यावे- उद्धव ठाकरे

मुंबई – भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी सोहळ्यादरम्यान बेताल वक्तव्य केले होते. याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदमांवर कडाडून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की हीन वृत्तीची माणसं मग ते परिचारक असतील, छिंदम असेल किंवा काल ज्यांनी तारे तोडले ते राम कदम असतील. माझ्या माता-भगिनींचा अपमान करणारे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये”

जसा परिचारक देशद्रोही किंवा माझ्या जवानांच्या माता-भगिनींच्याबद्दल ते जे बोलले त्याच पद्धतीने राम कदम बोलले आहेत. म्हणून मला असं वाटतं की भाजपने, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभिर्यानं लक्ष देऊन, तात्काळ जी काही कारवाई ती तुमच्यात असलेल्या धाडसाने करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray@uddhavthackeray

माझ्या माता-भगिनींचा अपमान करणारे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये !

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button