महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 15 जुलै पर्यंत लागण्याची शक्यता…
फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. आता फक्त सर्वजण HSC बोर्डाच्या निकालाची वाट बघतायत. महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 15 जुलै पर्यंत लागण्यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्न करत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली… त्यामुळे अभियांत्रिकी आणि पदवीच्या अभ्यासक्रमासाठी देशा-परदेशात शिक्षणाचे पर्याय शोधू पाहणार्यांना येत्या काही दिवसातच बारावी निकालाची यंदाची तारीख बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये बोर्ड परीक्षांच्या अनेक तारखांबाबतचे फेक मेसेज फिरत असल्याची माहिती समोर आली होती. परंतू अद्याप मंडळाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org , mahahsscboard.maharashtra.gov.in , mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.