मजुरांचे रेल्वे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-33.png)
राज्यात अडकलेल्या आणि गावी जाऊ इच्छिणाऱ्या हजारो परराज्यांतील मजुरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांचे रेल्वे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जाणार आहेत…
लॉकडाऊनमुळे परराज्यांतील लाखो मजूर राज्यातील विविध भागांत अडकले आहेत. आतापर्यंत हजारो श्रमिकांना त्यांच्या राज्यात रेल्वेतून सोडण्यात आले आहे. अजूनही हजारो श्रमिक राज्यात आहेत. मात्र, काही कुटुंबांकडे गावी जाण्यासाठी पैसे नाहीत. रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची रक्कमही ते भरू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून रेल्वे तिकीटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागणीनुसार ही रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागानं शासन निर्णय काढला आहे.