breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळीपेक्षाही घाणेरडे – संजय राऊत

मुंबई | महाईन्यूज

सरकार स्थापनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काहीच बोलत नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देणा-यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. कालपर्यंत ही संख्या 170 होती. आज ती संख्या 175 वर गेली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री सेनेचाच होणार आहे, असे सांगत भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळीपेक्षा घाणेरडे असल्याचा घणाघात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (दि. 3) मुंबईत पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून शिवतिर्थावर लवकरच शपथविधी होईल. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सरकार स्थापनेच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. लवकरच याबाबत जाहीर करण्यात येणार आहे. गणित जमले की माध्यमांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाचे गृहमंत्री अमित शहा राज्यातील घडामोडींवर काहीच बोलताना दिसत नाहीत. त्यांचे मौन रहस्यमय असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button