breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्यानेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या समाजाची नाराजी नको म्हणून या समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याबरोबरच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेऊन धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केला आहे.

अनुसूचित जमातीला मिळणाऱ्या सवलती मिळाव्यात, अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. धनगर समाजाची नाराजी आगामी लोकसभा निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते. कारण बारामती, सोलापूर, माढा, सातारासह अन्य काही मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे मतदार मोठय़ा प्रमाणात आहे. भाजपने या समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.  आदिवासी समाजाच्या सवलतींचा लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मात्र धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्यास विरोध दर्शविला आहे. आमच्या सवलतींमध्ये धनगर समाजाला का सामावून घेण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांनी केला आहे.

धनगर समाजाची आणखी एक मागणी सरकारने मान्य केली आहे. यानुसार सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. हा समारंभ उद्याच होणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे ही मागणी कायम आहे. हा निर्णय होईपर्यंत आदिवासी समाजाच्या सवलतींचा लाभ देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्हच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुढाकार घेतलेले डॉ. विवेक महात्मे यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button