झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/8-13.jpg)
संगमेनर |महाईन्यूज|
मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे.
संगमनेर येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी हे वक्तव्य केले. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा आठवले म्हणाले. भाजपने मनसे बरोबर युती न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे.
रामदास आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफी दिली आहे. ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असुन पाकने तो भाग भारताला द्यावा. युद्ध न करता पाकने पुढाकार घेत जर पाकव्याप्त काश्मीर दिला तर योग्यच नाही तर युद्ध करून तो भाग भारताने काबीज करावा, अशी आमची भूमिका असल्याच आठवले यांनी यावेळी सांगितले.