breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘ज्यांना देव मानलं त्याच मुख्यमंत्र्यांनी घात केला, दिलीप देशमुख करणार बंडखोरी

लातूर – अहमदपूरमध्ये भाजपचे बंडखोर नेते दिलीपराव देशमुख यांनी मोठी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला.

‘ज्यांना देव मानलं त्याच मुख्यमंत्र्यांनी घात केला,’ असं म्हणत दिलीपराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दिलीप देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पण गेल्या तीन टर्मपासून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या देशमुखांना भाजपने यंदाही डावललं.

तिकीट न मिळाल्याने दिलीप देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत पक्षाविरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता भाजप उमेदवारासमोरच नवं आव्हान उभं राहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button