breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनामुळे 200 लोकांना घेऊन गावाकडे निघालेला ट्रक पोलिसांच्या हाती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या भितीपोटी पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे २०० नागरिकांना घेऊन गावी निघालेले दोन ट्रक पोलिसांनी पकडले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात पोलिसांनी हे ट्रक पकडले असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार असल्याचे समोर आले आहे. सध्या कोरोनामुळे पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरातून गावी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच गावात येण्यास नकार दिला जात आहे.

नागरिक भीतीपोटी शहरातून गावी जात आहेत. पायी, सायकल आणि मिळेल त्या वाहनाने गाव गाठत आहेत. दरम्यान पुणे आणि सातारा जिल्ह्यात काम करणारे कामगार काल रात्री ट्रकमध्ये गावी जाण्यास निघाले होते. दोन ट्रक होते. त्यात जवळपास 200 हुन अधिक नागरिक होते. हे नागरिक गंगाखेड तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात येत आहे. मात्र, शहरामध्ये पोलीस गस्त घालत बाहेर फिरणाऱ्यांना अडवत आहेत. त्यांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. तर ट्रक, खासगी बसेस देखील चेकिंग केली जात आहे. कळंब शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन ट्रक दिसून आले. त्यांनी या ट्रकची पाहणी केली. त्यावेळी त्यात हे नागरिक गावी निघाले असल्याचे दिसून आले. त्या सर्वांना आता येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

ट्रकमधील सर्व नागरिक पुण्यात मिळेल ते काम करत होते. मात्र, कोरोनामुळे सर्वच कंपन्या आणि उद्योग बंद आहेत. त्यामुळे त्यांचे कामे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे ते गावी निघाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. कुठंच त्यांची चेकिंग झाली नाही पुण्यातून हे दोन ट्रक मानसे घेऊन निघाल्यानंतर त्यांना कळंबपर्यत कुठे अडविले नाही. किंवा त्यांची तपासणी केली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button