breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरोनाबाधित भारतातील तब्बल 37 कोरोना रुग्ण बरे

नवी दिल्ली- संपूर्ण देश कोरोनाच्या भीतीने हैराण झाला असताना एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतामध्ये तब्बल 37 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिसचार्ज देण्यात येणार आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ झाली नसून तो आकडा 9वरच आहे. त्यामुळे भारत कोरोनावर मात करण्यासाठी यशस्वी होणार असंच म्हणावं लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी जाणार आहेत. तर मुंबईतही एक जोडपं कोरोनावर मात करून घरी जाणार आहेत. आज त्यांची अखेरची चाचणी करण्यात येणार आहे. खरंतर देशामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता तात्काळ कठोर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी मदत होत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, यापैकी बहुतेकांना कोणत्याही औषधाची गरज नाही आहे. सध्या त्यांच्यावर सहाय्यक उपचार केले जात आहेत. भारतातील बहुते लोकांमध्ये सौम्य संसर्ग आहे.  सध्या केवळ 5 टक्के लोकांना ICUमध्ये ठेवण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button