breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली

  • आमदार रमेश कदम यांचा ठाणे कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप

  • मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

  • ठाणे कारागृह प्रशासनाला समन्स

मुंबई – अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

कारागृह प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली, असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर कैद्याची प्रकृती बिघडली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

रमेश कदम यांच्या आरोपांनुसार, ठाणे कारागृहात 27 जून रोजी ही घटना घडली. यासंदर्भात रमेश कदम यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची नोंद घेत आयोगाने आयोगाला प्रशासनाला समन्स बजाविले आहेत. तसेच आरोपांना आधार म्हणून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कारागृह निरिक्षक आणि इतर पोलजस कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत आहे. त्यांच्यावर 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रॅंण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button