breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार्तिकी यात्रेचा मार्ग मोकळा शासनाची सशर्त परवानगी

मुंबई –  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास प्रशासनातर्फे बंदी करण्यात आली होती. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याने शासनाने 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर या काळात आळंदी येथ होणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याला सशर्त परवानगी दिली आहे. तसेच समस्त वारकरी मंडळींना ही आनंदाची बातमी आहे.

महाराष्ट्र सरकारने कोरोना रोगाचा प्रसार रोखणे आणि सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवणे  हा उद्देश समोर ठेवला आहे. याच निदर्शावर ही यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून शासनातर्फे सार्वजनिक नियमांचे काटेकोर पालन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश दिले आहेत. 

यात्रेसाठी काही नियमावली तयार करण्यात आले आहेत. यात कमीत कमी व्यक्तींची मर्यादा, ऑनलाइन दर्शन, यात्रेच्या काळात संचारबंदीचे नियम यांचा समावेश आहे. तसेच या कालावधीत वारकऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या धर्मशाळेत, मठात, भक्तनिवासात  प्रतिबंध करणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, कोवीड 19 निकषांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button