breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार देखील घेत आहेत कोरोनाबाबत ही काळजी

भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रोज नविन रुग्ण आढळत आहेत… भारतातील कोरोना रग्णांची संख्या ३९ वर पोहोचली असल्याचं सांगण्यात येत आहे…कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरीक करत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दाखवली आहे.

अजित पवार यांनी  बारामतीत झालेल्या विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी अजित पवार यांनी एकही व्यक्तीला हात न मिळवता, प्रत्येक ठिकाणी हात जोडून नमस्कार केला. यावर बोलताना कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत असून तुम्हीही अशीच काळजी घ्या, असा सल्ला अजित पवारांनी उपस्थितांना दिला.

अजित पवार म्हणाले की, लोकांना वाटेल मी उपमुख्यमंत्री झालो आहे. म्हणून आता हात मिळवत नाही. मात्र तसं काही नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे मी हातात हात देणं टाळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच कोरोना आजाराबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी असं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केले.

दरम्यान, राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार होलिकोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button