breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी : संजय निरुपम

मुंबई  – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एका उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी. त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.

आमच्याकडून चुकी झाली, असे राज ठाकरे यांनी जाहीर करावे. त्यानंतरच उत्तर भारतीय समाजाशी संबंध जोडावेत आणि उत्तर भारतीय समाजही राज ठाकरे यांना मोठ्या मनाने स्वीकारेल, असे त्यांनी सांगितले. येत्या 2 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवली इथे बुराभाई हॉलमध्ये सकाळी अकराच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्‍टोबर रोजी आमंत्रण दिले होते, जे आता त्यांनी स्वीकारले आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसेच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी इमेज तयार करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button