मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या होण्याची शक्यता
मुंबई – अँटिलिया स्फोटक प्रकरणी मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर आता सचिन वाझे यांचीही हत्या होऊ शकते. त्यामुळे सचिन वाझे यांच्या जीवाला धोका असून त्यांना संरक्षण ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.
ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल”.