राम मंदिराच्या छताला गळती का लागली? मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचं स्पष्टीकरण
![Why is the roof of Ram temple leaking? Explanation of Nripendra Mishra, Chairman of Temple Construction Committee](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ram-Mandir-Ayodhya-780x470.jpg)
Ram Mandir Ayodhya | २२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमाला सहा महिने पूर्ण झाले. अशातच रामलल्लाची मूर्ती ज्या गाभाऱ्यात ठेवली आहे तिथे पहिल्या पावसातच गळती सुरु झाली आहे. त्यावर आता मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिलय. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच बांधकाम सुरु आहे, हे यामागे कारण आहे. संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी साठलं आणि मंदिराच्या छतामधून गळती सुरु झाली. दुसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत छत बंद होईल. त्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार नाही.
हेही वाचा – इंद्रायणी नदी प्रदूषणाला नगरपरिषद-ग्रामपंचायतींचा गाफीलपणा!
मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी काढण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नाही. पाणी हातानेच काढावं लागतं. अन्य सर्व मंडपात उतरण आहे. पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे तिथे पाणी जमा होत नाहीय. राम मंदिर निर्माण समिती कोट्यवधी राम भक्तांना आश्वस्त करु इच्छिते की, मंदिर निर्माणात कुठली कमतरता नाहीय. कुठलही दुर्लक्ष झालेलं नाही, असं नृपेंद्र मिश्रा म्हणाले.
सत्येंद्र दास काय म्हणाले?
राम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याचे सांगितले. जिथे प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साठलं होतं. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणं आवश्यक आहे. तसेच यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पूजा करणे कठीण होईल, असं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.