Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

परदेशात असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी, सुचनांचं पालन करण्याचं आवाहन

Iran Israel War : इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानं जगात चिंताजनक परिस्थिती आहे. या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24 x7 हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्लाह (पॅलेस्टाईन)

फोन : +970592916418

ईमेल : [email protected] / [email protected]

दोहा (कतार)

फोन : 00974-55647502

ईमेल : [email protected]

रियाध (सौदी अरेबिया)

फोन : 00-966-11-4884697

WhatsApp : 00-966-542126748

टोल फ्री : 800 247 1234

ईमेल : [email protected]

हेही वाचा –  ‘राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेल अवीव (इस्रायल)

फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल : [email protected]

तेहरान (इराण)

फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री : 800-46342

WhatsApp : +971543090571

ईमेल : [email protected] / [email protected]

कुवैत

फोन : +96565501946

ईमेल : [email protected]

बाहरीन

फोन : 00973-39418071

मस्कत

टोल फ्री : 80071234

WhatsApp : +96898282270

ईमेल : [email protected] / [email protected]

जॉर्डन

फोन : 00962-770 422 276

बगदाद (इराक)

फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाइट :eoibaghdad.gov.in

ईमेल : [email protected] / [email protected] / [email protected]

इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका असा संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भारताची मोठी कोंडी झाली आहे. तिन्ही देशांशी भारताचे असलेले संबंध पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे. भारत आणि इस्रायलचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. तर इराण आणि भारताची मैत्री बरीच जुनी आहे. सामरिक आणि आर्थिक बाजूंचा विचार केल्यास इराणचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या युद्धात अमेरिका इस्रालयच्या बाजूनं आहे. त्यामुळे परराष्ट्र संबंध, धोरण सांभाळताना भारताची गोची होणार आहे. अमेरिका आणि इस्रायलने आज (28 जानेवारी) इराणवर संयुक्त हल्ला चढवला. गेल्या काही आठवड्यांपासूनच अमेरिकेनं यासाठीची तयारी सुरु होती. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. काही देशांनी इराणला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जगात दुफळी माजण्याची चिन्हं आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button