breaking-newsताज्या घडामोडी

#Sari | औरंगाबादेत दुहेरी संकट, SARI रोगाने तिघांचा मृत्यू

औरंगाबाद । कोरोनासोबतच नवं संकट उभं राहिलं आहे. शहरात सारी (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस) ग्रस्त रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी सारी या रोगाने तिघांचा बळी घेतला आहे. आतापर्यत या आजाराने जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या सारीचे 12 रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे औरंगाबादकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, औरंगाबादमध्ये आता पुन्हा दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 20वर पोहोचली असून त्यांच्यावर शासकीय घाटी रुग्णाालत उपचार सुरू आहेत.दरम्यान, कोरोना आणि सारी आजाराची लक्षणे सारखी आहेत. सारीच्या आजारात रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. दम लागतो. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनते. प्रशासनाने 14 सारी रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही लॅबला पाठवले होते. त्यापैकी दहा रुग्णांच्या संदर्भातील नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी माहिती दिली. आहे. चार रुग्णांबद्दलचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button