breaking-newsताज्या घडामोडी
#Lockdown | औरंगाबादेत लाइट बंद होताच दगडफेक
औरंगाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी रात्री शहरात एकजुटीचे दर्शन म्हणून लाइट्स बंद करून दिवे लावण्यात आले. त्यावेळी झालेल्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना भारत नगर परिसरात घडली. त्यात महिलेचे डोके फुटले आहे. भारत नगरच्या प्लॉट नंबर ५९ मध्ये हा प्रकार घडला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार, शहरात घरोघरी रविवारी रात्री नऊ वाजता विजेचे दिवे बंद करण्यात आले व दिवे, मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या अंधारात अज्ञातांनी दगडफेक केली.
त्यात प्रमिला नरवडे या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले व उपचार करण्यात आले. दगडफेक नेमकी कोणी व का केली हे कळू शकलेलं नाही.