breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

‘शेतकऱ्यांना सीबील मागाल तर एफआयआर करू’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज मुंबईतील झालेल्या खरीप पूर्व हंगाम बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीक कर्जासाठी सीबीलची कारणे देत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास बँकांवर एफआयआर केला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – मोठी बातमी : पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा, हायकोर्टाचे आदेश

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आमची आरबीआयच्या प्रतिनीधी आणि स्टेट बँकर्स कमिटीशी बैठक झाली. यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की, शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सीबीलची अट लागू करू नये. ते दर सीबीलची अट लागू करणार नाहीत असे म्हणतात पण प्रत्यक्षात ते शेतकऱ्यांना सीबीलचे कारण देत कर्ज नाकारतात. पण यावेळीही असेच झाले तर आम्ही बँकांवर एफआयआर दाखल करणार आहोत.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button