Coronavirus: एअर इंडियाची विमानसेवा 30 एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरसच्या परिणाम एअर इंडियाची विमानसेवेवरही झाला आहे.एअर इंडियाने इटली, फ्रान्स, दक्षिण कोरिया, कुवेत, माद्रिद आणि कोलंबो या देशांना जाणारी आणि येणारी विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द केली आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे कर्नाटकमधील एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतातील हा कोरोना व्हायरसचा पहिला बळी आहे. आतापर्यंत ७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या महाराष्ट्रातही वाढते आहे. महाराष्ट्रात १४ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी ९ जण हे पुण्यातील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक कार्यक्रम तूर्त रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दिल्लीमध्ये ३१ मार्चपर्यंत सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये सर्व शाळांनाही या कालावधीत सुटी जाहीर करण्यात आली आहे. केवळ दिल्लीतील परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत.