breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

बिहारमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू तर १०० प्रवासी जखमी

Bihar Train Accident : बिहारमधील बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्सप्रेस रूळावरून घसरल्याने रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. ट्रेनचे २० डबे रूळावरून घसरल्याने हा अपघात झाला. टूरीगंजे ते रघुनाथपूर दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर, १०० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पाटणा येथील आयजीआयएमएस रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – १६ वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीने उभारली कोट्यावधींची ‘AI’ कंपनी 

अपघातस्थळी NDRF, SDRF, जिल्हा प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. २३ डब्यांची ही ट्रेन सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलहून रवाना झाली होती. रघुनाथपूर स्टेशनजवळ हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button