22 लाख 88 हजार नागरिकांची जेवणाची सोय,सर्वोच्च न्यायालयात सरकारनं मांडली बाजू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट ओळखून मोदींना हा निर्णय घेतला. देशात सोमवारी कोविड-१९ चे १०७१ रुग्ण असून, २९ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपासून देशात ९२ नवे रुग्ण समोर आले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णाचा आकडा २०० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट अद्यापही देशावासियांना त्रस्त करताना दिसून येत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतरही नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे.
बीड जिल्ह्यात आज सकाळीच दुधाच्या टेम्पोमधून स्थलांतर करणाऱ्या चाळीस मजुरांना अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरातील वाण नदीच्या आसपास २४ व तालुक्यातील सोनहिवरा येथे सांगलीहून आलेल्या १६ मजुरांना अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी कारवाई करून ताब्यात घेतले. या सर्व मजुरांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कोरोना व्हायरसचे कुठलेही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आंतरराज्यीय वाहतूकीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. तर, गरजू आणि मजूरवर्गाला आहे तिथेच थांबण्याचे आदेश दिले असून जवळपास २२ लाख ८८ हजार नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सर्वांना आश्रय देण्यात आला असून हे कामगार आणि मजूर वर्गातील नागरिक असल्याचे मेहता यांनी कोर्टात सांगितले