हिंगोली पँथर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल खिल्लारे यांचा शेकडो समर्थकांसह ‘वंचित’मध्ये प्रवेश
हिंगोली । प्रतिनिधी
जिल्ह्यातील तरुण तडफदार युवा नेत्रुत्व तथा पँथर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ खिल्लारे यांनी आज 27 सप्टेंबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.
ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्या – छोट्या वंचित समूहाना एकत्रित करून शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय द्रुस्ट्या मागासलेपन घालविण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे आणि त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या संघटना काढुन त्यांची ताकद कमी करण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्याची गरज आम्हाला जास्त वाटते म्हणुन आम्ही आज रोजी आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत असल्याचे राहुल खिल्लारे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष मा.केशवदादा मुड्डेवाड, वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मा.रविंद्रभाऊ वाढे,जेष्ठ नेते मा.रमेशभाई भुजबळ,जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,जिल्हा प्रवक्ता रूपेश कदम, जिल्हा सचिव मा.राजु वाट,जिल्हा सहसंघटक मा.अनिल कांबळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.बबन भूक्तर,जेष्ठ नेते मा.अतीखुर रहेमान,युवा नेते योगेश नरवाडे ,प्रकाश गव्हाणे,प्रवीण, बारहाते,आनंद खन्दारे,प्रा.रतन लोन्कर,रतन कांबळे,भीमा सुर्यतळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.