breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्यूायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा ठोठावली आहे. आता प्रशांत भूषण दंड भरणार की नाही हे पाहावं लागेल.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं, प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याला पब्लिसिटी मिळवून दिली, यानंतर कोर्टाने हे प्रकरण विचारात घेतलं. या खंडपीठात न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.

माफी न मागण्यावर प्रशांत भूषण ठाम
प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम आहेत. 25 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, माफी मागण्यात गैर काय आहे? हा शब्द एवढा वाईट आहे का? सुनावणीत अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी भूषण यांना समज देण्याचा सल्ला दिला होता. दुसरीकडे भूषण यांची बाजू मांडणारे वकील राजीव धवन यांनी सांगितलं की, “भूषण यांनी कोणाचा खून केला नाही किंवा चोरी केलेली नाही, त्यामुळे त्यांना शहीद करु नये.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button