breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लष्कराच्या विमानाने वुहानमधील १०० भारतीयांना मायदेशात आणणार

नवी दिल्ली | महाईन्यूज

वुहान या चीनमधील करोना विषाणूग्रस्त शहरातील १०० भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले लष्कराचे विमान पाठविण्यात येणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले आहे. वुहानमधील आणखी भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारताने सी-१७ हे लष्करी वाहतूक विमान पाठविण्याची तयारी केली असून चीनकडून त्याला मान्यता मिळण्याची भारताला प्रतीक्षा आहे.

ज्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांना क्षमतेची मर्यादा पाहून चीनमधील दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आम्ही अन्य देशांच्या नागरिकांनाही सामावून घेणार आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button