“पायी जाणाऱ्यां मजूरांना टोलनाक्यावर अन्न-पाण्याचा पुरवठा करा”- नितीन गडकरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-296.png)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना बसला आहे. वाहतूकसेवा बंद असल्यामुळे हे मजूर पायीच गावाकडे निघाले आहेत. आपल्या गावाकडे पायी जाणाऱ्यां मजूरांना टोलनाक्यावर अन्न-पाण्याचा पुरवठा करा, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-55.png)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटलं आहे की, ‘आपल्या घराकडे पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजूर तसंच नागरिकांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करा. सध्याच्या परिस्थितीत आपण या बांधवांची मदत केली पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच टोल ऑपरेटर्सना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मला खात्री आहे की, टोल ऑपरेटर्स या सूचनेला चांगला प्रतिसाद देतील’, असे गडकरींनी म्हटल आहे.