पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार : माजी मंत्री शिवाजीराव नाईक
शिराळा । महाईन्यूज । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले पत्र हे शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेवटच्या घटकातील नागरिकापर्यंत पोहोचले जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने देशातील सामान्य नागरिकांना लिहिलेल्या पत्राचा शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये वितरण शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी उपअध्यक्ष सत्यजित देशमुख, ‘मा.नरेंद्र मोदी सरकार पर्व २’ अभियान कार्यक्रमचे सांगली जिल्हा संयोजक निशिकांत पाटील यांच्या हस्ते शिराळा येथे करण्यात आला.
यावेळी मा.नरेंद्र मोदी सरकार पर्व २ अभियान राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले. स्वागत प्रस्ताविक तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी केले.
जिल्हा संयोजक निशिकांत पाटील म्हणाले , गेल्या वर्षभरामध्ये व मागील पाच वर्षांमध्ये या देशातील सामान्य गोरगरीब जनतेच्या सक्रीय सहकार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मिळाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सतत नवी स्वप्ने व नवनवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक महत्वकांशी पावले उचलली आहेत. “सबका साथ! सबका विकास! सबका विश्वास “! हा मंत्र घेऊन आज देशाची सामाजिक आर्थिक घडी बसवण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत.
सत्यजित देशमुख म्हणाले, भारत देशासमोर आज अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला संपूर्ण देशाला सामना करावा लागत आहे .परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशवासियांना बरोबर घेऊन निश्चितपणे या संकटावर मात करतील .नरेंद्र मोदी यांनी जे आपल्या देशासाठी केलेल्या कामाचे पत्र लिहिले आहे . ते गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम बूथ कमिटी अध्यक्ष मंडल अधिकारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे .तरच रात्रंदिवस आपल्या सर्वांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे. या पुढील काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशासाठी झोकून काम केले पाहिजे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या कामाचे पत्र व मा.नरेंद्र मोदी सरकार पर्व २ अभियान कार्यक्रमचे नियोजन, शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरांमध्ये पोहोच करण्याचे काम सर्व भाजप पदाधिकारी यांना बरोबर घेऊन करणार असल्याचे आव्हान त्यानी केले .
यावेळी शिराळा तालुका भाजप अध्यक्ष सुखदेव पाटील ,वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष सी एच पाटील ,जि.प सदस्य संपतराव देशमुख , युवा नेते रणजितसिंह नाईक ,माजी सभापती हणमंतराव पाटील, सुजित देशमुख ,नगरसेवक- बंडा डांगे,कासेगाव महिंद्र पाटील,प्रतापराव यादव,सम्राटसिंह शिंदे, बबलु शेळके,रघुनाथ पाटील,उत्तम निकम , आनंदराव पाटील, महादेव कदम,
अभियानचे सहसंयोजक परशुराम नागरगोजे,भाजपाचे मिलिंद कोरे,संजय हवलदार,रोहीत चिवटे,आप्पासाहेब सावंत,शहारुख शिकलगार, दीपक पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, डॉ एसपांडुरंग गायकवाड, सतिष पाटील, संदीप पाटील, व्ही पाटील, आदि पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.