Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशातील युवकांमध्ये राजकतेविषयी संताप – पंतप्रधान मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Modi-1.jpg)
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’च्या ६०व्या एपिसोडमध्ये देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपण सर्व २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात प्रवेश करत असल्याचे सांगत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
२०१९चे अनेक क्षण आपल्या सोबत आहेत. आता आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करत नाही तर एका नव्या दशकात प्रवेश करत आहोत. हे दशक भारताच्या तरुणाचं असेल. एकविसाव्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यासाठी सक्रिय भूमिका निभावतील, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.