चिनी स्मार्टफोन ब्रँड्सची सुट्टी करणार जिओ-गुगलची नवी जोडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/xiaomi_redmi_note_8_android_10_miui12.jpg)
नवी दिल्ली | सर्वात मोठी टेक कंपनी गुगल आणि भारतीय टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ एकत्र आल्याने इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील तसेच चायनीज ब्रँड्स सुट्टी सुद्धा करू शकते. दोन्ही कंपन्या एकत्र येवून भारतात स्वस्तात ४जी आणि ५जी स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारीत करीत आहे. एनालिस्ट्सच्या माहितीनुसार, या नवीन जोडीमुळे चायनीज ब्रँड्सला मोठे आव्हान मिळणार आहे. यांचे मार्केट शेअर ८० टक्क्यांहून अधिक आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Jio.jpg)
गुगल आणि जिओ पार्टनरशीमध्ये भारताचा नेटवर्कला 4G वरून 5G वर स्वीच करण्याचा प्रयत्न करतील. तसेच या नवीन जोडीमुळे स्मार्टफोन मार्केट वेगाने बदलू शकतो. याचे थेट परिणाम चायनीज स्मार्टफोन कंपन्यांना भोगावे लागतील. सध्या स्मार्टफोन मार्केटवर चायनीज स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, जिओ-गुगलच्या एकत्रितपणामुळे चायनीज कंपनीला शेयर गमावू लागू शकते.