breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
चिंताजनक! आसाममध्ये पुराचा हाहाकार सुरुच, 128 जणांचा मृत्यू, तब्बल 26 लाखापेक्षा अधिक लोकांना फटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Assam-flood-Heavy-Rain-Asam.jpg)
दिसपूर : आसाममधील पूरस्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. आतापर्यंत आसाममध्ये 23 जिल्ह्यांमधील 26 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. लाखो लोकांना पुरामुळे विस्थापित करुन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. राज्यात रविवारी आणखी 5 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. आसामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाला आहे.
आसाम राज्य आपत्ती निवारण विभागाने (ASDMA) दिलेल्या पूरस्थितीच्या माहितीवरुन बारपेटा आणि कोकराझार जिल्ह्यांमध्ये रविवारी प्रत्येकी दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मोरीगाव जिल्ह्यात देखील एकाचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये पूर आणि इतर पुराशी संबंधित कारणांमुळे तब्बल 102 तर भूस्खलनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे.