breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोनामुळे जेलमधून सुटले, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर
गुवाहाटी | आसाममधील कोरोना संसर्गामुळे तुरुंगात असलेल्या दोन भावांना तुरुंगवासापासून मुक्ती मिळाली. परंतु गावात पोहोचल्यावर किरकोळ प्रकरणावरून स्थानिक लोकांशी भांडणं झालं. हे दोन भाऊ गावात येताच वादाला सुरुवात झाली. सुरू झालेला हा शाब्दिक वाद इतका वाढला की, ग्रामस्थांनी या दोन भावांचा हाणामारीत थेट खून केला. ही घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बकसा जिल्ह्यातील सिमुलगुरी जवळील अतिबरी गावात हा खून करण्यात आला होता. बकसा जिल्ह्यातील एसपी थुब प्रितीक विजय कुमार यांनी सांगितले की, हे खेड्यातील दुश्मनीचे प्रकरण आहे आणि दोन्ही भाऊ या गुन्ह्यात सामील होते. ते म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे आणि बाकीच्यांना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे.