औरंगाबादमध्ये पुन्हा लागणार लॉकडाऊन? लोकप्रतिनिधींमध्ये बैठक सुरू
औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाने कहर केला आहे. येथे रोज झपाट्याने रुग्ण वाढत आहे. याच कारणामुळे शहरात सोमवारी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार की नाही याबाबत आज लोकप्रतिनिधी, प्रशानस आणि उद्योजक यांच्यात बैठक सुरू आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर होते.
लोकप्रतिनिधींमध्ये पहिली बैठक झाली. दरम्यान या बैठकीला खासदार इम्तियाज जलील गैरहजर होते. दुसरी बैठक लोकप्रतिनिधी, प्रशासक, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, विभागीय अधिकारी सुनील केंद्रेकर, मनपा अस्तिक कुमार पांडे. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे अधिकारी तर हरीभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, प्रदीप जैसवाल, अंबादास दानवे, सतिश चव्हाण हे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. तसेच मुकुंद कुलकर्णी, राम भोगले, मानसिंग पवार हे उद्योजकही बैठकी हजर आहेत.