breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#CoronaVirus: भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जनतेने विचार करावा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्या भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा. हातात काळं घेताना एकदा विचार करावा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
“हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना? असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2020
आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना ? #महाराष्ट्रद्रोहीBJP