यामुळे झाला मलायका-अरबाजचा घटस्फोट ?
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा गेल्या वर्षी म्हणजेच 12 मे 2017 रोजी घटस्फोट झाला होता. याचे आता कारण समोर आल्याचे बोलले जात आहे. नुकतीच अरबाजने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या याच सवयीमुळे अरबाज-मलायकामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जातेय.
अरबाजने पोलिसांसमोर आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांवर सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली दिली आहे. अरबाज आणि बुकी सोनू जलाल यांची आज पोलिसांनी समोरासमोर चौकशी केली.
”बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल करुन दबाव आणल्याचा दावा” अरबाजने केला आहे. आयपीएलच नव्हे तर कसोटी सामन्यांवरही सट्टा लावल्याचेही त्याने यावेळी सांगितले. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणे पसंत नव्हते, असेही तो म्हणाला. यामुळेच अरबाज आणि मलायकामध्ये वाद होऊन त्यांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जात आहे.