अखेर भारतासमोर चीन नमला, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात
![Finally, China bowed to India, importing these goods for the first time in 30 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/India-China-Relations.jpg)
नवी दिल्ली: लडाख सीमेवर तणाव असताना भारताने चीन विरुद्ध अनेक निर्णय घेतले आहेत. चिनी APPsवर बंदी घातली आणि लोकांच्या विरोधामुळे दिवाळीत होणारी चिनी वस्तूंची यावर्षी झालेली नाही. त्यामुळे चीनला 40 हजार कोटींचा फटका बसलेला होता. हा तणाव कायम असताना चीनने गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतातून तांदूळ आयात केलेला आहे. आत्तापर्यंत भारतातल्या तांदूळाचा दर्जा उत्तम नसल्याचं कारण देत चीन आयात करत नव्हता मात्र शेवटी चीनचा भारताकडून तांदूळ आयात करावाच लागलेला आहे. चीन हा जगातला सर्वात मोठा तांदूळ आयात करणारा तर भारत हा पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/2018_9large_rice_basmat.jpg)
मात्र चीन भारत सोडून पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या देशांमधून तब्बल 40 लाख टन तांदूळ आयातो करतो. मात्र यावर्षी या देशांमध्ये पुरेसा तांदूळ उपलब्ध नाही. त्याच बरोबर भावही जास्त असल्याने चीनने भारताकडून 1 लाख टन तुकडा तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 300 डॉलर प्रतिटन असा भारताचा भाव आहे.दरम्यान, भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या 8व्या फेरीत यासंबधीच्या फॉर्म्युल्यावर सहमती झालेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य होतं त्याच ठिकाणी पुन्हा सैनिक परतणार आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलेली आहे.
आवश्य वाचा- 31 डिसेंबरला नव्या राजकीय पक्षाची घोषणा- अभिनेता रजनीकांत