breaking-newsराष्ट्रिय
#Lockdown:तेलंगणाने महाराष्ट्र, आंध्रातून आलेल्या लोकांना केली मनाई
हैदराबाद. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र, गुजरात व आंध्र प्रदेशातून आपल्या राज्यात प्रवेश करणाऱ्यांना मनाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत या तीन राज्यांतून आलेल्या लोकांना पुढील प्रवासासाठी पास देण्यासही मनाई केली आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे रविवारी पोलिसांनी चेन्नईहून आलेल्या परराज्यातील मजुरांना रोखले.हे मजूर मूळचे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडिशातील असल्याचे सांगण्यात येते. हे लोक सायकलने प्रवासावर निघाले आहेत. पोलिसांनी त्यांची येथे भोजन व विश्रांतीची व्यवस्था केली आहे.