breaking-newsराष्ट्रिय

संघाचा शबरीमला मंदिराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

केरळमधील शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याचा घाणाघाती आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशावरुन गेल्या काही दिवसांपासून शबरीमला मंदिर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

ANI

@ANI

Kerala government made it clear in front of the Supreme Court that it will implement the verdict. The govt arranged all facilities. Neither govt nor the police tried to block the devotees. RSS tried to make a war zone: Kerala CM Pinarayi Vijayan

View image on Twitter

ANI

@ANI

Protesters tried to check vehicles, attacked women devotees and media persons. It was the first time in the history of Kerala that this type of attitude was shown towards the media: Kerala CM Pinarayi Vijayan pic.twitter.com/dTdyRQssv0

View image on Twitter

पिनरायी म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे केरळ सरकार पालन करीत आहे. महिलांना प्रवेशासाठी सरकारने संरक्षणासह सर्वप्रकारच्या सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे सरकार किंवा पोलीस प्रशासन भाविकांना अडवण्याचे प्रयत्न करीत नाही. त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था अपयशी ठरल्याचे म्हणता येणार नाही. उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शबरीमला मंदिर परिसराला युद्ध क्षेत्र बनवलं आहे.

दरम्यान, आंदोलक येथे येणाऱ्या लोकांची वाहने तपासत आहेत. महिला भाविकांवर तसेच माध्यम प्रतिनिधींवर हल्ले करीत आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या गोष्टी घडत आहेत. माध्यमांप्रती अशा स्वरुपाचा आक्रमक पवित्रा पहिल्यांदाच राज्यात पहायला मिळत आहे, असेही मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button