राहूल गांधी यांनी अमेठीतील पराभव केला मान्य, म्हणाले ‘जनताच मालक’
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आपल्या पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठी येथून पराभव झाला असून येथून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी विजय संपादित केला आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच स्मृती इराणी अमेठी मतदारसंघातून आघाडी घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. स्मृती इराणींनी घेतलेले मताधिक्य हे काही हजारांमध्ये असले तरी राहुल गांधी यांना ते अखेरपर्यंत तोडात न आल्याने अखेर इराणींची हेच मताधिक्य निर्णायक ठरलं.
दरम्यान, राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेमध्ये अमेठी येथील आपला पराभव स्वीकारला असून त्यांनी अमेठीतील त्यांच्या विरोधी उमेदवार असलेल्या स्मृती इराणी यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी भाजप अध्यक्ष माहित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील लोकसभा निवडणुकांमधील विजयाबाबत अभिनंदन केले. जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, “जनता मालक आहे. जनतेचा कौल मान्य”.