breaking-newsराष्ट्रिय

राजधानीत पुन्हा धुळीच्या वादळाचा तडाखा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसला आहे. त्याचबरोबर काही भागात पाऊसही बरसला, बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुन्हा हा वातावरणाचा बदल पहायला मिळाला आहे.

अचानकपणे प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. या वादळातील धुळीने संपूर्ण शहराला अक्षरशः कवेत घेतल्याचे चित्र होते. त्याचबरोबर येथील तापमानातही घट झाल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यापूर्वीही १३-१४ तारखेला देशातील पाच राज्यांना धुळीच्या वादळाने तडाखा दिला होता. यामध्ये ८० जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी हवामान खात्याने हे गडगडाटी वादळ पुढील ४८ ते ७२ तासांत पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button