breaking-newsTOP Newsराष्ट्रिय
देशात २४ तासांत कोरोनाचे ४९ हजार नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-75-1-2.jpg)
नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनाचे ४९, ३१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे भारत आता लवकरच दिवसाला ५० हजार रुग्ण सापडण्याचा टप्पा ओलांडू शकतो. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे.
आतापर्यंत भारतात कोरोनाचे १२,८७९४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४,४०, १३५ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ८,१७, २०९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे देशातील ३०,६०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे भारत अत्यंत बिकट परिस्थितीत सापडला आहे.