breaking-newsराष्ट्रिय

दरवर्षी पदवीदान करणे विद्यापिठांसाठी अनिवार्य

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विद्यापिठांना लेखी सूचना

नवी दिल्ली – देशातील विद्यापिठांनी दरवर्षी पदवीदान करणे अनिवार्य करण्याबाबतची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही विद्यापिठांकडून दरवर्षी पदवीदान कार्यक्रम केला जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही लेखी सूचना करण्यात आली आहे. विद्यापिठांनी दरवर्षी नियमितपने पदवीदान कार्यक्रम केलाच पाहिजे. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी हा मोठा महत्वाचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद वाटावा असा हा सोहळा असतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विद्यापिठांनी यापूर्वी पदवीदान समारंभ कधी केला आहे, त्याचा तपशीलही सादर करण्याच्या सूचना मंत्रालयाने केल्या आहेत.

पश्‍चिम बंगालमधील विश्‍व भारती विद्यापिठामध्ये गेल्या 5 वर्षात पदवीदान झालेले नाही. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ त्रिपुरामध्ये यंदा चार वर्षांनी पदवीदान झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये गेल्या 46 वर्षात प्रथमच यंदा दोनवेळा पदवीदान समारंभ झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button