breaking-newsराष्ट्रिय
तुतिकोरीन हिंसाचाराला विरोधी पक्ष, समाजकंटक जबाबदार
नवी दिल्ली : तुतिकोरीन येथे पोलीस गोळीबारांत ११ जण ठार झाले त्याबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या हिंसाचाराला प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी चिथावणी दिल्याचा आरोप केला. राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर काही समाजकंटकांनी स्टरलाइट प्रकल्पविरोधी निदर्शनांमध्ये घुसखोरी केली आणि हिंसाचार घडविला, असा दावा पलानीस्वामी यांनी केला.
निदर्शनांना हिंसक वळण लाभले कारण काही राजकीय पक्षांनी त्याला चिथावणी दिली आणि समाजकंटक या निदर्शनांमध्ये घुसले. राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी जाणूनबुजून हिंसाचार घडविण्यात आला. सदर प्रकल्प बंद करण्यासाठी सरकार २००३ पासून प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.