breaking-newsराष्ट्रिय

अयोध्या नको, कर्जमाफी हवी; राजधानीत शेतकऱ्यांचा एल्गार

कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला असून या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘अयोध्या नको, कर्जमाफी हवी’, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्तीच देशावर राज्य करणार. शेतकरी ज्याला पाठिंबा देतील त्याचीच सत्ता येईल. जो शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार त्याचे नुकसानच होईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घ्यावा आणि देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी कायदा मंजूर करावा, अशा दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत पोहोचले आहेत. रामलीला मैदानातून निघालेला मोर्चा संसदेवर धडकणार आहे. या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारवर टीका केली.

‘अयोध्येत राम मंदिर नको, आम्हाला कर्जमाफी हवी’, अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी केली. या मोर्चात तेलंगणातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीदेखील सहभागी झाल्या होत्या. ‘माझ्या पतीची कापसाची शेती होती. पण त्यांनी आत्महत्या केली. मला तीन मुले असून शेतात मजुरी करुन उदरनिर्वाह सुरु आहे’, असे एका महिलेने सांगितले. ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची कोणीही मदत करत नाही. कापसाच्या शेतीत नुकसान झाले. पिकाचे नुकसान झाल्याने उत्पन्न कमी झाले आणि यामुळे शेतकरी आत्महत्या करतात’, असे तेलंगणातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. दरम्यान, मेधा पाटकर, अरुण रॉय, योगेंद्र यादव आणि विजू कृष्णन आदी नेते या मोर्चातील शेतकऱ्यांना संबोधित करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button