Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची दहा हजार कोटींची बचत, ह्या आठवड्यात मार्च-एप्रिलचे अनुदान?

मुंबई: महायुती सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी ठरलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली. त्यातील पात्र अपात्र बहिणींची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आता फक्त १ कोटी ७७ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. अंतिम पडताळणी नंतर ६६ लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. सरकारचे या योजनेवर महिन्याला आता २ हजार ६५५ कोटी खर्च होणार आहेत. यापूर्वी हा खर्च ३ हजार ६०० कोटी रुपये होता. सरकारचे वर्षाला यामुळे दहा हजार कोटी वाचणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर काहीतरी जालीम उपाय शोधण्याची गरज महायुती सरकारला वाटली. त्यानंतर मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेली लाडली बहीण योजना महाराष्ट्रात लागू करण्याचे ठरले. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाची उसंत न घेता ही योजना जून २०२४ मध्ये जाहीर केली.

सरकारच्या वतीने दरमहा गरीब गरजू महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये घरपोच देण्याचे आश्वासन सरकारने दिले. या योजनेसाठी सरकारने सहा प्रकारचे निकष लावले होते पण ते नंतर पायदळी तुडवण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांनी या योजनेचा फायदा त्यांच्या महिला मतदारांना व्हावा यासाठी पक्ष कार्यालयात योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. महिला हा एकमेव निकष लावून हे अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे श्रीमंत घरातील महिलांनीही पंधराशे रुपयांच्या लालसेपोटी अर्ज भरले होते.

हेही वाचा –  पंतप्रधान मोदी यांनी आवाहन करताच मंत्री आशिष शेलार यांच्या खात्याकडून झटपट तीन महत्वाचे निर्णय

अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न, घरात चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही या सरकारी पैशाचा मोह आवरला नाही. त्यामुळे पहिल्यांदा सरकारला दोन कोटी ५३ लाख लाडक्या बहिणींना कोट्यावधी रुपयाचे सरकारी अनुदान द्यावे लागले. त्यानंतर थोडी टीका झाल्यानंतर ही संख्या दोन कोटी 47 लाखापर्यंत खाली आली. अपात्र महिलांनाही सरकारी अनुदान देण्यात येत असल्याची टीका जोर धरू लागली.त्यानंतर परिवहन विभागाकडून चार चाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबांची माहिती मागविण्यात आली. इतर सरकारी योजनांचा फायदा घेणाऱ्या महिलांची कृषी विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आली. सरकारच्या आय टी विभागाने अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरविले.

सरते शेवटी लाडक्या बहिणीची ही संख्या दोन कोटी ४३ लाख पर्यंत खाली आली. ऑक्टोंबर नोव्हेंबर मधील विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी सरकारला भरभरून मतदान केले. त्यामुळे महायुती सरकारला निर्विवाद बहुमत मिळाले आणि हे सरकार सत्तेवर आले. भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट झाला. देवेंद्र फडणवीस या राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button