breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘शंभर टक्के २८८ पाडणार, मी सरकारला सावध करतोय’; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे. जरांगे पाटील पुढे काय भूमिका घेणार? याकडे संपुर्ण राज्यचं लक्ष लागलं आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. सरकारनं संभ्रमात राहू नये, मी सरकारला सावध करतोय. आम्ही १०० टक्के २८८ जागा पाडणार असल्याचं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारशी बोलणं झालं नाही. आजचा पूर्ण दिवस दिलेला आहे. सरकार काय करत आज बघू. आजचा दिवस बोलता येणार नाही. पुढचा दैरा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे. विरोध केला तरी आम्ही अंमलबजावणी घेणार आहे. मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही.

हेही वाचा    –    ‘शरद पवार गटाचं १ मत फुटलं’; पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचं विधान 

बैठकीला विरोधकांनी जायला पाहिजे होते. नाही आले म्हणजे तुम्ही त्यांच कारण सांगणार का आम्हाला? ते बैठकीला नाही आले म्हणजे आमचा बळी घेणार का? असा सवाल करत मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. एकदा निर्णय घेतला तर सुफडा साफ होईल, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला.

मी तुम्हाला सावध करतोय. आम्ही राजकारणात येणार नाही. आलो तर १०० टक्के २८८ जण पाडणार. राज्यात पॉवर मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे. मराठ्यांच्या मतावर आताचे आमदार झालेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button